शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:36 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत.

ठळक मुद्दे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावरब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत. त्याजागी नवीन सिमेंट काँक्रीटच्या पुलांची उभारणी होणार आहे. सन १९३४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल वाहतुकीस खुले झाले होते. त्यानंतर गेली ८४ वर्षे या पुलांवरून कित्येक टन अवजड वाहतूक सुरू आहे. ब्रिटिशकाळात उभारलेले हे पूल समर्थपणे सेवा बजावत आहेत.

मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची उभारणी करताना तत्कालीन ब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण झाली. या पुलांमुळे रस्तामार्गे वाहतुकीला चालना मिळाली. त्याचबरोबर समुद्र किनारी असलेल्या बंदरातून बोट तसेच अन्य मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली.

रस्ते तसेच पूल उभारले गेल्यामुळे  मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात  नांदगाव, तळेरे, कणकवली, ओरोस, कसाल आदी छोट्या मोठ्या नव्या बाजारपेठा उदयास आल्या. तसेच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांचेही महत्त्व वाढले.कणकवली शहरालगत  गडनदी आणि जानवली नदीवरील पुलांची कामे १९३० मध्ये सुरू झाली. यातील जानवली पुलाला त्यावेळी १ लाख ३७ हजार ६६९ रुपये खर्च आला होता. तर गडनदी पुलाचे बांधकाम १ लाख २६ हजार रुपयांमध्ये पूर्ण झाले. दोन्ही पुलांवरून १९३४ मध्ये वाहतूक सुरू झाली. महत्त्वाची बाब म्हणजे महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलाचा अपवाद वगळता गडनदी आणि जानवली नदीसह महामार्गावरील इतर ब्रिटिशकालीन पूल मागील ८४ वर्षात अवजड वाहने आणि अनेक पूर झेलूनही मजबूत राहिले आहेत.उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुनाआॅगस्ट २०१६ मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पुलांची कामे झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणातील अपूर्ण पुलांची कामे डिसेंबरअखेर पूर्ण केल्यानंतर कणकवली शहरालगत गडनदी, जानवली, कसाल येथील जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. त्यामुळे  उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेले हे पूल इतिहासजमा होणार आहेत.चौकटकाळाच्या ओघात आठवणी नष्ट होणारसिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन खारेपाटण पुलाचे बांधकाम सन १९४६ ते ४७,  पियाळी पुलाचे बांधकाम सन १९४१,  जानवली पुलाचे बांधकाम १९३४, कणकवली गडनदी पूल सन १९३४,  कसाल पूल १९३४, पीठढवळ पूल १९५७,  बांबर्डे पूल बांधकाम १९३८ साली करण्यात आले आहे. या पुलांशी निगडीत अनेक आठवणी असून जुन्या जाणत्या लोकांकडून त्या ऐकायला मिळतात. हे पूल पाडल्यानंतर काळाच्या ओघात या आठवणी नष्ट होणार असल्याची हुरहूर अनेक नागरिकांना लागून राहिली आहे. तशी प्रतिक्रिया ते व्यक्त करताना दिसत आहेत.

 

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग