शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:36 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत.

ठळक मुद्दे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावरब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत. त्याजागी नवीन सिमेंट काँक्रीटच्या पुलांची उभारणी होणार आहे. सन १९३४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल वाहतुकीस खुले झाले होते. त्यानंतर गेली ८४ वर्षे या पुलांवरून कित्येक टन अवजड वाहतूक सुरू आहे. ब्रिटिशकाळात उभारलेले हे पूल समर्थपणे सेवा बजावत आहेत.

मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची उभारणी करताना तत्कालीन ब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण झाली. या पुलांमुळे रस्तामार्गे वाहतुकीला चालना मिळाली. त्याचबरोबर समुद्र किनारी असलेल्या बंदरातून बोट तसेच अन्य मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली.

रस्ते तसेच पूल उभारले गेल्यामुळे  मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात  नांदगाव, तळेरे, कणकवली, ओरोस, कसाल आदी छोट्या मोठ्या नव्या बाजारपेठा उदयास आल्या. तसेच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांचेही महत्त्व वाढले.कणकवली शहरालगत  गडनदी आणि जानवली नदीवरील पुलांची कामे १९३० मध्ये सुरू झाली. यातील जानवली पुलाला त्यावेळी १ लाख ३७ हजार ६६९ रुपये खर्च आला होता. तर गडनदी पुलाचे बांधकाम १ लाख २६ हजार रुपयांमध्ये पूर्ण झाले. दोन्ही पुलांवरून १९३४ मध्ये वाहतूक सुरू झाली. महत्त्वाची बाब म्हणजे महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलाचा अपवाद वगळता गडनदी आणि जानवली नदीसह महामार्गावरील इतर ब्रिटिशकालीन पूल मागील ८४ वर्षात अवजड वाहने आणि अनेक पूर झेलूनही मजबूत राहिले आहेत.उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुनाआॅगस्ट २०१६ मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पुलांची कामे झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणातील अपूर्ण पुलांची कामे डिसेंबरअखेर पूर्ण केल्यानंतर कणकवली शहरालगत गडनदी, जानवली, कसाल येथील जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. त्यामुळे  उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेले हे पूल इतिहासजमा होणार आहेत.चौकटकाळाच्या ओघात आठवणी नष्ट होणारसिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन खारेपाटण पुलाचे बांधकाम सन १९४६ ते ४७,  पियाळी पुलाचे बांधकाम सन १९४१,  जानवली पुलाचे बांधकाम १९३४, कणकवली गडनदी पूल सन १९३४,  कसाल पूल १९३४, पीठढवळ पूल १९५७,  बांबर्डे पूल बांधकाम १९३८ साली करण्यात आले आहे. या पुलांशी निगडीत अनेक आठवणी असून जुन्या जाणत्या लोकांकडून त्या ऐकायला मिळतात. हे पूल पाडल्यानंतर काळाच्या ओघात या आठवणी नष्ट होणार असल्याची हुरहूर अनेक नागरिकांना लागून राहिली आहे. तशी प्रतिक्रिया ते व्यक्त करताना दिसत आहेत.

 

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग